छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य.

By MPSC Corner

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधामंडळ जाणून घ्या मराठी माहिती.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

💥 राज्याचा प्रचंड भार सांभाळायचा तर राज्यव्यवस्था बळकट असणे अत्यावश्यक. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला स्वराज्याचा रथ सुरळीत चालावा यासाठी प्रधान, अधिकारी, सरदार यांची अत्यंत दूरदृष्टीने निवड केली होती.

💥राज्यव्यवस्थेत राजाच्या खालोखाल येत असे ते प्रधान मंडळ. शिवाजी महाराजांचे प्रधान मंडळ हे आठ जणांचे असल्याने त्यास अष्टप्रधान मंडळ असे नाव होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते व त्यांची कामे काय होती याचा विचार या लेखात करू.

 

पद व्यक्ती कार्य
मुख्यप्रधान {पंतप्रधान }मोरोपंत त्रंबक कांबळे राज्यकारभार चालविणे
आमात्य रामचंद्र नीलकंठ मुजुमदार जमाखर्च पाहणे
सचिव {सुरनीस }अण्णाजी दत्तो आज्ञापत्रे तयार करणे
मंत्री दत्ताजी त्रंबक वाकनीस पत्रव्यवहार व वैयक्तिक संरक्षण
सेनापती हबीरराव मोहिते सैन्याची व्यवस्था पाहणे
सुमंत रामचंद्र त्रंबक डबीर परराज्य ,परराष्ट्र सबंध ठेवणे
न्यायाधीश निराजीपंत रावजी स्वराज्याचे सरन्यायाधीश
पंडितमोरेश्वर पंडितराव धर्मखात्याचे प्रमुख
हे आपल्याला माहिततच पाहिजे ,पाठ करून ठेवाच .

थोडीच पण महत्वपूर्ण माहिती नक्की वाचून काढा.👇👇

▪️पंडीतराव व न्यायाधीश सोडुन बाकी सर्वांना प्रसंग पडल्यास लष्करी मोहीमेवर जावे लागे.

▪️छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रदेश सरसुभा सुभा-परगणा यामध्ये विभागले होते.

▪️सरसुभ्यावरील प्रमुखास सरसुभेदार म्हणत असे.

▪️परगण्यावरील प्रमुखास सरहवालदार म्हणत असे व सुभ्यावरील प्रमुखास सुभेदार म्हणत असे.

▪️ परगण्यात अनेक महाल असत तर त्या महालांवर हवालदार नावाचा अधिकारी होते.

▪️लहान खेड्याला मौजे म्हंटले जाई व मोठ्या खेड्याला कसबा म्हंटले जाई.

▪️छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजव्यवहार कोश तयार करून घेतला होता. प्रत्येक खेड्यात पाटील, कुलकर्णी, चौगुले असे वतनदार अधिकारी असत.

▪️पेठे मध्ये महाजन असे वतनदार असत, व परगण्यामध्ये देशमुख, देशपांडे असे वतनदार असत.

▪️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात 18 कारखाने व 12 महाल होते.

▪️राज्यातील न्यायाच्या क्षेत्रातील अंतिम अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते.

🎯 गावातील खटल्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी जी सभा घेतली जात असे तिला गोतसभा असे म्हटले जाई. 

📌 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात दोन प्रकारचे घोडदळ होते.

1) बारगीर – सरकारी मालकीची असत. 

2) शिलेदार – खासगी मालकीची असत.

📌छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यामध्ये तीन प्रकारचे किल्ले असत. 

1) पर्वतावरील किल्ले – गड – रायगड, प्रतापगड

2) समुद्रातील किल्ले – जंजीरा, विजयदुर्ग

3) सपाट भुमिवरील किल्ले – कोट – भुईकोट

🔘 छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण सुमारे 370 किल्ले होते. किल्ल्यावर तीन प्रमुख अधिकारी नेमले जात असे.

1) हवालदार – संरक्षण

2) सबनीस – जमाखर्च 

3)कारखानीस – अन्नधान्य पुरवठा

▪️ छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासकारांनी किल्ल्यांचा राजा असे म्हंटले आहे. मायनाईक आणि दर्यासारंग ही आरमार प्रमुखाची पदे निर्माण केली गेली.

📌 पुरंदरचा तह 14 जुन 1665 रोजी छ. शिवाजी महाराज व मोगल यांच्यात पुरंदरच्या पायथ्याशी झाला. छत्रपती शिवरायांची शेवटची मोहिम कर्नाटक मोहिम होती. त्यात त्यांनी कुतुबशाहाशी मैत्री केली.

📌दक्षिणेत त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकला होता. निधन 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले.

😍 छत्रपती शिवाजी महाराजांची रणनिती, दूरदृष्टी, गनिमी कावा, संघटनकौशल्य, प्रजाहितदक्षता, शौर्य, अद्वितीय असेच होते.

माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.

 

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button